किल्ले राजगड
॥श्री॥
!! जय भवानी जय शिवराय !!
॥ किल्ले राजगड ॥
स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन ओळखल्या जाणारा हा गड. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वत:च्या देखरेखी खाली हा गड बांधला. ह्या थोर व्यक्तिंनी आपल्या स्वराज्यासाठी ह्याच गडावरुन खलबते केली. प्रजेबद्दलचे व स्वराज्याबद्दलचे मनातले सर्व विचार येथुन राबवले. ह्या थोर व्यक्तिंना ह्या गडाने जेवढे जवळुन पाहिले तेवढे इतिहासाला सुद्धा माहीत नाहीत.
पण आज गडाचे पावित्र धोक्यात आले आहे आपल्यामुळे. आपल्यापैकी बरेच जण ह्या गडाचा इतिहास विसरुन, थोर लोकांची वचने विसरुन गडावर मद्यपान करतात. मद्यपान करणे हा सर्वस्वी स्वत:च्या इच्छेवर अवलंबुन असले तरी कुठे करावे ह्याचे भान सहसा कोणी ठेवत नाहीत.
ज्या कारणासाठी हा गड बांधला आणि आज कोणत्या कारणासाठी हा वापरला जात आहे. ह्या गोष्टिचा विचार करण्याची खरचं गरज आहे.
सर्व नगर पालिका आणि महानगर पालिकांना भेडसावणारा प्रश्न आहे तो कचरय़ाचा. त्यात मुख्यत्वे प्लास्टिक पिशव्यांचा. आपण जेथे राहतो तो भग स्वच्छ ठेवणे जशी आपली जवाबदारी आहे, त्याप्रमाणे आपण जिथे निवांतपणे काही क्षण घालवतो तेथे स्वच्छता राखणे आपले कर्तव्य आहे. आपण आणलेल्या सामानातिल प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या बरोबर परत नेऊन त्याची विल्हेवाट लावावी.
गडाचे पावित्र्य आणि शोभा कुठल्याही प्रमाणात कमी होणार नाही असे कार्य आपणा हातुन घडणार नाही अशी शपथ आपण घेऊयात आणि आचरणात आणुयात.
स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवण्याची जवाबदारी आता आपल्यावर आहे. तेव्हा अश्या मोहिमेत स्वत:हुन आपाणांस सामिल करुन घेऊयात.
जय भवानी!!
शिव प्रेमी, गड प्रेमी
आपला
योगेश रत्नाकर फाटक.
पुणे.
भ्रमणध्वनी क्रमांक = ९८५०९ ५७००४
-------------------------------------------------------------------------------
जर आपणापैकी कोणी अश्या स्वरुपाच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छित असेल त्यांनी आपले नाव, पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक व ई-पत्र चा पत्ता मला द्यावा.
---------------------------------------------
Photo URL : http://new.photos.yahoo.com/phatakyogesh/album/576460762339605487
!! जय भवानी जय शिवराय !!
॥ किल्ले राजगड ॥
स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन ओळखल्या जाणारा हा गड. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वत:च्या देखरेखी खाली हा गड बांधला. ह्या थोर व्यक्तिंनी आपल्या स्वराज्यासाठी ह्याच गडावरुन खलबते केली. प्रजेबद्दलचे व स्वराज्याबद्दलचे मनातले सर्व विचार येथुन राबवले. ह्या थोर व्यक्तिंना ह्या गडाने जेवढे जवळुन पाहिले तेवढे इतिहासाला सुद्धा माहीत नाहीत.
पण आज गडाचे पावित्र धोक्यात आले आहे आपल्यामुळे. आपल्यापैकी बरेच जण ह्या गडाचा इतिहास विसरुन, थोर लोकांची वचने विसरुन गडावर मद्यपान करतात. मद्यपान करणे हा सर्वस्वी स्वत:च्या इच्छेवर अवलंबुन असले तरी कुठे करावे ह्याचे भान सहसा कोणी ठेवत नाहीत.
ज्या कारणासाठी हा गड बांधला आणि आज कोणत्या कारणासाठी हा वापरला जात आहे. ह्या गोष्टिचा विचार करण्याची खरचं गरज आहे.
सर्व नगर पालिका आणि महानगर पालिकांना भेडसावणारा प्रश्न आहे तो कचरय़ाचा. त्यात मुख्यत्वे प्लास्टिक पिशव्यांचा. आपण जेथे राहतो तो भग स्वच्छ ठेवणे जशी आपली जवाबदारी आहे, त्याप्रमाणे आपण जिथे निवांतपणे काही क्षण घालवतो तेथे स्वच्छता राखणे आपले कर्तव्य आहे. आपण आणलेल्या सामानातिल प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या बरोबर परत नेऊन त्याची विल्हेवाट लावावी.
गडाचे पावित्र्य आणि शोभा कुठल्याही प्रमाणात कमी होणार नाही असे कार्य आपणा हातुन घडणार नाही अशी शपथ आपण घेऊयात आणि आचरणात आणुयात.
स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवण्याची जवाबदारी आता आपल्यावर आहे. तेव्हा अश्या मोहिमेत स्वत:हुन आपाणांस सामिल करुन घेऊयात.
जय भवानी!!
शिव प्रेमी, गड प्रेमी
आपला
योगेश रत्नाकर फाटक.
पुणे.
भ्रमणध्वनी क्रमांक = ९८५०९ ५७००४
-------------------------------------------------------------------------------
जर आपणापैकी कोणी अश्या स्वरुपाच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छित असेल त्यांनी आपले नाव, पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक व ई-पत्र चा पत्ता मला द्यावा.
---------------------------------------------
Photo URL : http://new.photos.yahoo.com/phatakyogesh/album/576460762339605487
